HW News Marathi
महाराष्ट्र

‘ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी करुन तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं’ फडणवीसांना प्रतिउत्तर

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सातत्याने वाक् युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेनेकडून सातत्यानं केला जातो. तर असा कुठलाही शब्द दिला नसल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावलाय.

तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन

ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी ही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी डिसेंबर 2020 मध्ये औरंगाबादेत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी एक मिश्कील टिप्पणी केली होती. अनेक उद्योजक मला उद्घाटनासाठी निमंत्रण देत असतात. त्यांना मी इतकेच सांगतो की, तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तर ठाकरे यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आशावादी आहेत, याचा मला आनंद आहे. त्यांना 50 वर्षे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असं फडणवीस म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेश नाईक आयत्या वेळी पक्ष सोडतील असे मी सांगितले होतेच !

News Desk

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन दया- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

News Desk

मुख्यमंत्र्याच्या भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्याचं थेट राज्यपालांना पत्र

News Desk