HW News Marathi
Covid-19

मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

मुंबई | ब्रेक द चेन अंतर्गत महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत निर्बंध वाढवल्याची काल (३१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज (३१ मे) मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या २ मार्गिकांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या बोलताना म्हणाले की, मुंबईत होणाऱी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईतील आज ट्रॅफिक बघून मी आश्चर्यचकित झालो

“आज रस्त्यावरचं ट्राफिक बघून मी आश्चर्यचकित झालो. मी काल नेमकं काय बोललो अशी एकदा चौकशीही केली. मी चुकून सगळी बंधनं उठवली असं तर म्हणालो नव्हतो ना याबद्दल दोघा तिघांना विचारलं. मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बंधनं उठवलेली नाहीत. अजूनही करोनाचा धोका संपलेला नाही. जर का आपण गाफील झालो तर संथगतीने सुरु होणाऱ्या आयुष्याला पुन्हा ब्रेक लागेल. मुंबईत पुन्हा अशीच गर्दी होत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या दोन मार्गिकांचं सोमवारी उद्घाटन झालं. यासंबंधी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “निर्बंध जेव्हा उठतील तेव्हा अधिक जोमाने, कित्येक पटीने आपलं आयुष्य गतीमान होण्यासाठी म्हणून ही कामं आहेत”.

काय आहेत नियम?

धान्य, डाळी, फळे, भाजीपाला आदींच्या पुरवठय़ासाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. दुकानांमध्ये कोणत्याही वेळी वस्तुंचा पुरवठा करू शकतात. फक्त मालाची साठवणूक करण्यासाठी दुपारी २ नंतर दुकाने उघडे ठेवू शकतील. पण त्या काळात ग्राहकांना विक्री करता येणार नाही. तसे आढळल्यास कडक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. हॉटेलांना आताप्रमाणेच घरपोच सेवेस परवानगी आहे. हॉटेलांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. हे नियम १५ जूनच्या सकाळी सातपर्यंत लागू राहतील.

कोणत्या दुकानांना परवानगी मिळणार?

केशकर्तनालये, संगणक, पावसाळी वस्तू , कपडे आदी दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का, याची नागरिकांना अधिक उत्सुकता आहे. कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरे किंवा जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते. कोणती आणि कशा पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी द्यायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल. केंद्र सरकारला पत्र पाठवण्याची, प्रत्यक्ष बोलण्याची तयारी आहे, असेही ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

रेल्वे सेवेवरील निर्बंध कायम :

मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेचा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वापर करता येईल. सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. संपूर्ण जून महिना रेल्वेसेवेचा सामान्यांना वापर करता येणार नाही, असे संकेत आहेत.

ई–कॉमर्स : सर्व वस्तूंच्या वितरणास परवानगी :

कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेबरोबरच अन्य वस्तूंच्या वितरणाला परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालये बंदच :

सरकारी कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थितीस परवानगी असेल. खासगी कार्यालये किं वा आस्थापने बंदच राहतील. याबाबत आधीच्या आदेशात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठल्या प्रश्नावर आंदोलनं करायची याचं भान भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही !

News Desk

मुंबईकरांनो हे कधीही न पाहिलेले चक्रीवादळ, विनाकारण घराबाहेर पडू नका !

News Desk

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा

News Desk