HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेवर भाजपची खोचक टीका, म्हणाले……

मुंबई | ‘प्रश्नम’ या संस्थेनं अलीकडे १३ राज्यांमध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीतही आनंद व्यक्त होत आहे. ‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असून आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू’ असं मत ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत.

भाजपची खोचक टीका

राजकारणात महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये नेहमीच कुरघोडी सुरु असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १३ राज्यांमध्ये लोकप्रिय ठरले असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या प्रकरणात सुद्धा भाजपकडून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करण्यात आली. राज्य भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘महाराष्ट्रातल्या एक हजार लोकांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६०० लोकांनी मते दिली. या आधारावर उद्धव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. एवढीच मते मिळवायची होती तर १३ राज्यांत वणवण करण्याची काय गरज होती? एखाद्या हाउसिंग कॅाम्प्लेक्समधील निवडणुकीतही जास्त मतदार भेटले असते आणि ‘लोकप्रियता’ही कळली असती,’ असा खोचक टोला उपाध्ये यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या स्थानावर

‘प्रश्नम’ संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या १३ राज्यांतील जनतेचा कल जाणून घेतला. सुमारे १७,५०० मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शविली आहे. ‘द प्रिंट’ने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार

Aprna

काही प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले तर १५ दिवसांत परिणाम दिसतील, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

News Desk

करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकार असतानाच का नाही केली !- सचिन सावंत

News Desk