HW News Marathi
महाराष्ट्र

‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या’, मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता आनंद महिंद्रांना टोला

मुंबई | दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी महिंद्रांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल (२ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

काय म्हणाले उद्दव ठाकरे?

काही उद्योगपती म्हणतात की आरोग्य यंत्रणा वाढवण्यासाठी भर द्या. हॉस्पिटल उभारा. मात्र, नुसते फर्निचर उभे करून काय उपयोग? त्यासाठी डॉक्टर नकोत का? काही उद्योगपती हा सल्ला देत आहेत. त्यांना मी सांगतो, तुम्ही ५० डॉक्टर द्या, आपण तेही करू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आनंद महिंद्रांचं नाव न घेता त्यांनी खडेबोल सुनावले आहेत.

आनंद महिंद्रा यांनी काय ट्विट केले आहे ?

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे की,”उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेही करणार नव्या घरात गृहप्रवेश

News Desk

बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे! – वर्षा गायकवाड

Aprna

हिंगणघाटमधील मृत बहिणीला वाचवू शकलो नाही !

swarit