HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये, नाहीतर…!, विश्व हिंदू परिषदेचा इशारा

मुंबई । “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये. यानंतरही जर ते अयोध्येत आलेच तर इथे कोणीही त्यांचे स्वागत करणार नाही. उलट इथे त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल”, असा इशारा आता अयोध्येतील संतमंडळी आणि विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. “उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने अयोध्येत येऊ नये”, असा इशारा देण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच जुंपलेली असताना आता याला मिळत असलेले धार्मिक वळण निश्चितच चिंताजनक आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणतात की, “कंगना राणावत ही या देशाची शूर आणि धाडसी मुलगी आहे. तिने बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांच्या रॅकेटचे उद्योग उघडकीस आणले आहेत. कंगनाने बॉलिवूडच्या एका विशेष समूहाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे केवळ बॉलिवूड माफियाच नव्हे तर सरकारही घाबरले आहे. शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे. जी व्यक्ती सरकारविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करते त्याच व्यक्तिवर आरोप करून कारवाई केली जात आहे. म्हणूनच, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.”

मुंबई महानगरपालिकेने कंगना राणावतच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात हनुमान गढीजवळील मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, महंत नरेंद्र गिरी यांनी पालघरमधील साधूंच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, “कंगनाच्या या लढाईत संपूर्ण देश तिच्यासोबत आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

News Desk

….नाहीतर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना कडक सूचना

News Desk

धारावीतील लोकांच्या कोरोनाच्या टेस्ट केल्या जात नाहीत – दरेकरांचा आरोप

News Desk