HW News Marathi
महाराष्ट्र

बंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो – मुख्यमंत्री

पालघर | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधुदूर्ग दौऱ्यावेळी बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं सांगत युती तुटण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला जबाबदार धरलं. यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. मात्र यावर मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे पालघरमधील जव्हार दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

पालघर तसा नव्याने जाहीर झालेला जिल्हा आहे. जिल्हा म्हणून तिथे काही सोयी सुविधा निर्माण करुन देणं सरकारचं कर्तव्य आहे. सोयी सुविधा निर्माण करुन देताना कुपोषण ही मोठी समस्या आहे. हा विषय समोर आल्यानंतर तेवढ्यापुरतं लक्ष दिलं जातं. आपल्याला हे कुपोषण पूर्णपणे थांबवायचं आहे. ते जर थांबवायचं असेल तर संपूर्ण विभागाचा विकास करणं गरजेचं आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

जव्हारमध्ये आलोय म्हणजे फक्त जव्हार नाही तर संपूर्ण पालघऱचा विकास करायचा आहे. या विभागाला चांगला समुद्रकिनारा लाभला आहे. जव्हारसारखं ठिकाण हिल स्टेशन म्हणून विकसित केलं जाऊ शकतं. आदिवासी संस्कृती जपून आदिवासींचा विकास केला पाहिजे. पर्यटनासाठी विकास केला तर अनेक समस्या नष्ट होतील,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

“नुसती आरोग्य व्यवस्था सदृढ करुन चालणार नाही तर आदिवसांनादेखील चांगला रोजगार मिळाला पाहिजे, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, दळणवळण, उद्योग, पर्यटन या सर्वांचा एकत्रित विचार केला पाहिजे,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो म्हणत अमित शाह यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

“मी आज थोडक्यात आढावा घेतला आहे. काही प्रस्ताव आले असून काही येणं बाकी आहे. जलगदतीने विकासाची गाडी मला रुळावर आणायची आहे. मी फक्त सवंग लोकप्रियतेसाठी काही घोषणा करणार नाही. आजपासून पालघर जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे एवढंच सांगेन. निधी वैगेरे इतर गरजा पूर्ण केल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. “सगळ्यांची विमानं उतरतील अशी छोटी धावपट्टीही निर्माण करु असा विकास झाला पाहिजे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी खासदारांना संभाजीराजे छत्रपती यांचे पत्र

News Desk

महाबीजने कमावले ७० कोटी

News Desk

बीपीएल रेशनकार्ड धारकांची क्रुर चेष्टा, मिळणार फक्त अर्धा किलो साखर

News Desk