HW News Marathi
देश / विदेश

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबाबत राज्यपालांना सूचना करावी, ठाकरे सरकारची मोदींना विनंती

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (८ जून) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक पावणे दोन तासानंतर संपली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु झाली ती पावणे दोन तासानंतर संपली आहे. त्यामुळे मोदी आणि ठाकरे भेटीनंतर ही पत्रकार परिषद मराठ समाजासाठी अतिशय महत्वाची आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच म्हटलं की ही भेट अधिकृत होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जे विषय मांडले ते त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. एकूणच ही बैठक सकारात्मक झाली असं मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण या विषयावर चर्चा झाली. तसेच, मेट्रो कारशेडच्या जागेबाबतही यावेळी चर्चा झाल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींकडे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीचाही मुद्दा मांडला

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :

  • ८ महिने झाले तरी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर निर्णय नाही
  • राज्यपालांना याबाबत सूचना कराव्यात
  • राज्याला चक्रीवादळाचा वारंवार फटका
  • समुद्र किनाऱ्यावर संरक्षक भिंत बांधण्याचा मांडला प्रस्ताव
  • चक्रीवादळाच्या मदतीचे जुने निकष बदलावे
  • ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा – अशोक चव्हाण
  • मराठा आरक्षणाचा विषय आता केंद्राकडे
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
  • पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा फक्त राज्यापुरता मर्यादीत नाही
  • आरक्षण कायम ठेवण्यासाठी घटनादुरुस्ती करा
  • मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्य़ाची मोदींकडे केली विनंती
  • राज्याला जीएसटीचा २४ हजार ३०६ कोटींचा परतावा द्यावा – अजित पवार
  • पीक वीम्यासाठी बीड पॅटर्न राबवावा
  • दिल्लीत आलोय विषय सर्वांना माहिती आहे.पंतप्रधानांनी राज्यातील सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले.
  • आजची भेट अधिकृत होती. सकारात्मक चर्चा झाली
  • मराठा आरक्षण, ओबीसी पदोन्नती आरक्षण, मेट्रो कारशेड, जीएसटी परतावा, शेतकऱ्यांचा पीकविमा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली ही भेट सकारात्मक होती आणि लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
  • मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून केंद्राकडे
  • २०२१ च्या जणगणनेत ओबीसींची जणगणना व्हावी
  • एससी, एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा
  • मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेले राज्याचे विषयमुख्यमंत्र्यांनी मोदींसमोर मांडलेले विषय-

  • मराठा आरक्षणाचा विषय आहे
  • दुसरा महत्त्वाचा विषय इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे.
  • मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
  • चौथा मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय
  • जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे
  • शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रस्न – पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली
  • राज्यांमध्ये पाल.. स्पर्धात्मक
  • महत्त्वाचा विषय मुंबईमध्ये केली होती – गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत.
  • मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे – आवश्यक आहे, राज्य सरकारने गेल्यावर्षी निकष बदलून मदत केली.
  • मुळात NDRF चे निकष बदलणे आवश्यक
  • चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
  • मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिध्द पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन

News Desk

#AirStrike : भारतीय वायू दलाच्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा

News Desk

चहा, नाष्टा देत नाही म्हणून पत्नीला तलाक

News Desk