HW News Marathi
महाराष्ट्र

डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द ! राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन…

मुंबई | दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी करण्याचा सोहळा आज अचानक ठरला होता आणि आता तो अचानकपणे स्थगित करण्यात आला आहे .मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला जास्त लोकांना निमंत्रण नव्हतं आणि विरोधी पक्षनेत्यांनाही त्याची कल्पना नव्हती,या सोहळ्यासाठी आलेले अजित पवारही पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.या सोहळ्यावरून राजकारण करू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की ,इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले.

मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

News Desk

वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवरील वाढीव GST रद्द करावा; अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Aprna

‘जी – २०’ निमित्ताने पुण्यासह राज्य, देशाला क्षमता दाखविण्याची संधी! – चंद्रकांत पाटील

Aprna