HW News Marathi
महाराष्ट्र

कलम ३७०ला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, भाजपसाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची !

बुलढाणा | विधानसभा निवडणुकीच्या सर्व राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफास धगधगत आहेत. या प्रचार सभेत दिग्गज नेते एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (११ ऑक्टोबर) बुलढाण्याच्या चिखलीत जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत शहांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोधावरून घाणाघाती हल्ला केला आहे. भाजप मतांचे राजकारण करत नाही, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे शहा राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुन्हा सरकार आल्यानंतर त्यांनी ५ ऑगस्टला काश्मीरमधील कलम ३७० हटविले. काश्मरीमधील दहशतवाद्यामुळे ४० हजार लोक मारले गेले. “मतांचे राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्ष काश्मीर मधील कमल ३७० हटविण्यास विरोध करत होती. मात्र, भाजप मतांचे राजकारण करत नाही, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे.” असे शहा म्हणाले. तसेच कलम ३७० हटविण्यासाठी संसदेत घेण्यात आलेल्या मतदानात या दोन्ही पक्षांनी विरोधात मते केल्याचे देखील शहांनी सांगत त्यांचा खरपूस समाचार घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रचाराकरण्यासाठी देतील तेव्हा द्यांना विचारा की, तुम्ही काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या समर्थनात आहात की नाही, असा सवाल विचारा असे आव्हान देखील शहांनी जनतेला केले. पुढे म्हणले की, महराष्ट्रा आणि कलम ३७०चा काय संबंध आहे. केवळ महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील जनात काश्मीर भारताच्या अखंडातेशी जोडला राहिला पाहिजे ही इच्छा होती.देशातील जनतेची ही इच्छा पंतप्रधा नरेंद्र मोदींनी पूर्ण केली असल्याचे सांगत शहांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही !

News Desk

“ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका” रामदास आठवलेंचं भाष्य!

News Desk

ST कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार? अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार?

News Desk