HW News Marathi
देश / विदेश

चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची रामदास आठवलेंची मागणी

मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यामुळे सध्या भारत आणि चीन दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. या पाश्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करत चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, “चीन हा फसणार देश आहे. भारतवासियांनी चीनच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार केला पाहिजे. चायनीज खाद्य पदार्थ आणि आणि चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारे हॉटेल्स बंद झाले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी काल (१७ जून) ट्वीट करत केली होती. “भारताने चीनला बुद्ध दिला आहे युद्ध दिलेले नाही. पण चीन ला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील.भारतात कोरोना शी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू,” दुसऱ्या ट्वीटमध्ये आठवले म्हणाले आहेत.

चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी | केंद्र सरकार

भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय काल (१७ जून) रात्री घेतला आहे. भारत सरकारने दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश देण्यात आले. सरकारी 4G यंत्रणेत चीनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणे हटवण्याचे आदेश भारत सरकारने दिले आले आहेत. जुने टेंडर रद्द करुन नवीन टेंडर जारी करा, ज्यात चीन कुठेही नसेल, असा आदेश सरकारी दूरसंचार कंपन्यांना देखील देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राफेलवर चर्चा नाही ?

News Desk

महान एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती

Aprna

योगी आदित्यनाथ अयोध्येतून विधानसभा निवडणूक लढणार ? चर्चेला उधाण

Aprna