HW News Marathi
महाराष्ट्र

“मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?”; राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

बुलढाणा । केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. “तुमची मोदींवर टीका करण्याची लायकी आहे का?” असा सवाल करत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावलं आहे. बुलडाणातील चिखली अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी आयोजित करलेल्या उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबिरात नारायण राणे उपस्थितांना मार्गदशन करत होते. यावेळी, “विद्यमान मुख्यमंत्री अज्ञानी आहेत”, अशीही टीका नारायण राणेंनी केली.
“साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता केवळ पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचंच काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हेच कळत नाही. अतिवृष्टी आली, वादळ आलं, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावं, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. तुमची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची लायकी आहे का?”, असा कठोर सवाल यावेळी नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. ही टीका करून नारायण राणे पुढे म्हणाले की, “आम्हाला आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवायचा नाहीय.”

“आम्हाला आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवायचा नाहीय.”

पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना राणे म्हणाले की, “पंतप्रधानांनी

गोरगरिबांसाठी सात वर्षांत अनेक योजना केल्या. शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान दिलं. आम्हाला आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवायचा नाही. समाजातील प्रत्येक नागरिकांचे उत्पन्न कसं वाढेल, जीवनमान कसं उंचावेल, प्रगती कशी होईल, शिक्षण, आरोग्य अशा सुविधा सर्वसामान्यांना मिळतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांगली बातमी! राज्यात ऑगस्टमध्ये 17 हजार 372 बेरोजगारांना रोजगार, नवाब मलिक यांची माहिती!

Ruchita Chowdhary

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा !

News Desk

भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर!

News Desk