HW News Marathi
Covid-19

मुंबईतील निर्बंध अजूनही कायमच, मुंबई महापालिकेने घेतला निर्णय

मुंबई | करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि खाटांची उपलब्धता या आधारे ठाणे आणि पुण्यासह २१ जिल्ह्यांमधील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार असले तरी मुंबईत गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई महापालिकेने जोखीम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदीही कायम राहील. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. दुकाने खुली ठेवण्याची वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच राहणार आहे.

रुग्णसंख्या, संसर्गदर आणि प्राणवायूयुक्त रिक्त खाटांचे प्रमाण या आधारे दर शुक्रवारी आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार सोमवार, १४ जूनपासून कोणत्या जिल्ह्यात कशी परिस्थिती असेल, याचे निर्देश आपत्ती निवारण विभागाने जारी केले. त्यानुसार मुंबईतील संसर्गदर कमी झाल्याने शहराचा दुसऱ्या स्तरात समावेश झाला. परंतु मुंबईची भौगौलिक रचना, अतिवृष्टीचा इशारा आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबईचा सध्याचा तिसरा स्तर महापालिके ने कायम ठेवला.

लोकल रेल्वे प्रवास बंदच

नोकरदारांना या आठवड्यातही लोकल प्रवासाची मुभा मिळू शकणार नाही. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटलेले असले तरी मुंबईतील निर्बंध या आठवड्यातही कायम ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्येची घनता, लोकलमधील संभाव्य गर्दी आणि अतिवृष्टीचा इशारा या पाश्र्वाभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील निर्बंध शिथिल के ले नाहीत.

आधीचीच नियमावली असणार लागू

  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल रेल्वे प्रवासाची मुभा.
  • अत्यावश्यक गटातील दुकाने रोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू.
  • अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत आणि शनिवार-रविवार बंद.
  • मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच राहतील.
  • उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत, नंतर घरपोच सेवा.
  • सार्वजनिक मैदाने, उद्याने, वॉकिं ग ट्रॅक दररोज सकाळी ५ ते ९ सुरू.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने.
  • चित्रपट आणि मालिका चित्रिकरण स्टुडिओत किं वा गर्दी होणार नाही अशा ठिकाणी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
  • सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने.
  • लग्न सोहळे ५० टक्के उपस्थितीत, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी.
  • बस प्रवास १०० टक्के क्षमतेने, उभे राहून प्रवासावर बंदी.
  • ऑनलाईन खरेदीवर कोणतीही बंधने नाहीत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

News Desk

पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी

News Desk

राज्याची चिंताजनक स्थिती ! नव्या कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट २३ हजारांच्या पार

News Desk