HW News Marathi
देश / विदेश

“… तोपर्यंत मी विधानसभेत पाऊल ठेवणार नाही!”, चंद्राबाबू नायडूंनी घेतली शपथ

मुंबई | मी जोपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तेत येत नाही. तोपर्यंत मी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत पाऊल देखील ठेवणार नाही, असा शपथ आंध्र प्रदेशचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. सध्या आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस जगमोहन रेड्डी यांची सरकार आहे. वायएसआर काँग्रेसच्या आमदारांकडून सातत्यानं अपमान होत असून माझ्या पत्नीवर देखील वायएसआर काँग्रेसवालं टीका करत आहे, असा आरोप नायडू यांनी राज्य सरकारवर केला आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी आज (१९ नोव्हेंबर) मंगलागिरी येथील तेलगू देसम पक्षाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी चंद्राबाबू नायडू म्हणालं, “अडीच वर्षात मी शांतपणे अपमान सहन करत होतो. पण आता वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी माझ्या पत्नीचा अपमान केला. आणि मी हे कदापि सहन करणार नाही. मी नेहमी सन्माननं जीवन जगले आहे. मी आता हे सहन नाही करून शकत. यामुळे मी जोपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तेत येत नाही. तोपर्यंत मी आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत पाऊल देखील ठेवणार नाही.” हेसर्व बोलताना चंद्राबाबू नायडू ढसा-ढसा रडलं. तर दुसऱ्या बाजुला वायएसआर काँग्रेस चंद्राबाबू नायडू नाटक करत असल्याचं म्हटलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा, आठवलेंचा सल्ला

News Desk

आरबीआयकडून नव्या २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र

News Desk

नितीन गडकरींनी जेव्हा दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडला आणि ‘महाराष्ट्रा’चा बोर्ड लावला

News Desk