HW News Marathi
देश / विदेश

नितीन गडकरींनी जेव्हा दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडला आणि ‘महाराष्ट्रा’चा बोर्ड लावला

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या केंद्रिय मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडला. यात महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना संधी मिळाली त्यांचा सत्कार केंद्रिय मंत्री नितिन गडकरींच्या हस्ते एका कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी अनेक जुने किस्से सांगितले. मराठ्यांच्या इतिहासात दिल्लीला महत्वाचं स्थान आहे. अटकेपार झेंडे दिल्लीच्या मार्गातूनच लावले गेले. ह्या सर्व काळात मराठी राजांनी दिल्लीत अनेक वास्तू उभारल्या. काही महत्वाच्या जागाही त्यांच्याच नावावर राहील्या. स्वातंत्र्यानंतर त्यात बराचसा बदल झाला. पण काही गोष्टी तशाच राहील्या.

त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दिल्लीतली जमीन आणि त्यावर आता उभं असलेलं महाराष्ट्र सरकारची ‘महाराष्ट्र सदन’ ही टोलेजंग वास्तू. छगन भुजबळांच्या काळात सदनाचं काम पूर्ण झालं. पण ज्या जागेवर ती वास्तू उभीय ती नेमकी महाराष्ट्राला कशी मिळाली, कुणी मिळवली याची माहिती फारच कमी लोकांना असेल. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीत मराठी केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदनची जमीन कशी मिळवली याचा प्रसंग त्यांनी सांगितला.

या जागेशी माझं भावनिक नातं

गडकरी यावेळी बोलताना म्हणाले की, मी 95-97 साली मंत्री होतो. ही वास्तू जी होती ती गुजरात महाराष्ट्राच्या राजाची होती. स्वातंत्र्यानंतर ही गुजरात सरकारला मिळाली. त्या राजाची जी दुसरी गुजरातबाहेरची प्रॉपर्टी होती ती महाराष्ट्राला मिळाली. ही जागा होती गुजरात सरकारच्या नावावर. त्यानंतर चीन युद्धाच्या वेळी भारत सरकारनं इथं डिफेन्सची कॉलनी बनवली. राणेसाहेब त्यावेळेस मंत्री होते, अफझलपूरकर मुख्य सचिव होते, मी पीडब्ल्यूडी मंत्री होतो, ही जागा आपली आहे, आम्हाला मिळावी म्हणून भांडत होतो. पण आम्हाला काही हाताला लागत नव्हतं. केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं ते नाकारलं.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन वास्तू

…आणि मला एक दिवस मनोहर जोशींनी सांगितलं की, नितीन तू आता हे भांडण उकरु नकोस. त्यांनी आम्हाला एक

अल्टरनेटीव्ह जागा दिली आणि ती आपण घेऊ. तू ह्या जागेचा काही आग्रह करु नको, मी म्हटलं सर, मी काही सोडत नाही. तुम्ही

माझ्यावर सोडा, ही महाराष्ट्राची जागाय, मी मिळवल्याशिवाय नाही राहणार. आपल्या महाराष्ट्रात सिंधी अधिकारी होते बांठिया. त्याला धरलं आणि चार जण इथं आलोत. इथं दिल्लीत भारत सरकारचा बोर्ड होता तो खोदून काढला आणि फेकला. नंतर सिमेंटचे गड्डे केले आणि ही महाराष्ट्र सरकारची जागा आहे असा बोर्ड लावला होता.

दिल्लीमध्ये मी अपघाताने आलो

“दिल्लीमध्ये मी अपघाताने आलो. मी येण्यासाठी तयार नव्हतो. जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी संस्कृती. मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी इतिहास हा एकदम वेगळा आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण मराठी सारस्वाताचा आणि महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र औद्योगिक तसंच साहित्य, संस्कृती, इतिहास या सर्व गोष्टींमध्ये पुढे आहे. संगीत, गाणं, चित्रपट सगळ्या बाबतीत मराठी माणसाचा दबबबा आहे. महाराष्ट्र अजून सुखी, समृद्ध. संपन्न, शक्तिशाली व्हावा, फक्त साधनांनी नाही तर साहित्य, संस्कृती, कला यांनीदेखल व्हावा असं स्वप्न आहे,” असं नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तपासासाठी मशिदीत गेलेल्या पोलिसांवर लोकांकडून दगडफेक

Gauri Tilekar

अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश

News Desk

इस्रो ‘मिशन चंद्रयान-२’ साठी सज्ज, ९ ते १६ जुलैदरम्यान होणार प्रक्षेपण

News Desk