HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात उर्दू माध्यमांच्या शाळा १८ जूनला सुरू होणार

मुंबई | शैक्षणिक वर्ष यंदा 15 जूनपासून सुरु होत आहे. परंतु 16 जूनला रमजान ईद असल्याने राज्यातील सर्व उर्दू माध्यमांच्या शाळांना 2 दिवसांची सूट देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे उर्दू शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात यंदा 18 जूनला होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात विदर्भ वगळता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात ही 15 जूनपासून होणार आहे.

अपवादानेच या उर्दू शाळांना यंदा ईदची सुट्टी येत असल्याने त्यांना 2 दिवसांची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व उर्दू माध्यमांच्या शाळा या 15 जूनऐवजी आता 18 जूनला सुरू होणार आहेत. मात्र, इतर शाळा या 15 जूनपासूनच सुरू होतील. त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने काढलेल्या एका परिपत्रकात दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

GDP घसरण्यासाठी तरी देवाला जबाबदार धरू नका, शत्रुघ्न सिन्हांचा केंद्राला टोला

News Desk

मेरे पास ना घर ना द्वार फिर क्या उखाडेगी बुलडोझर सरकार?

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी घेतले केदारनाथचे दर्शन

News Desk
मुंबई

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

News Desk

मुंबई | एसआरए प्रकल्पातील श्रेयवादातून शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून एसआरए प्रकल्पातील श्रेय वादातून सावंत यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सावंत यांच्या हत्येसाठी 10 लाखांची सुपारी देण्यात आली होती.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशमधून 6 जणांना तर मुंबईतून एकाला अटक केली आहे. त्याचबरोबर हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल देखील पोलिसांनी जप्त केले आहे. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 14 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन सावंत शिवसेनेच्या कुरार शाखेचे माजी उपशाखाप्रमुख होते. ते कांदिवली येथील एसआरए प्रकल्पाचे प्रवर्तक देखील होते. याच प्रकल्पात ब्रिजेश पटेल हा देखील प्रवर्तक आहे. या प्रकल्पावरुन दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती त्यातून सावंत यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts

शितल म्हात्रे यांना धमकावल्या प्ररकणी दोघाना अटक

News Desk

विक्रोळी पुलावर अपघात, चार मुली जखमी

News Desk

‘त्या’ला कुर्ला स्थानकात सापळा रचून पकडले

News Desk