HW News Marathi
महाराष्ट्र

वंचितची काँग्रेसला ४० जागांची ऑफर, निर्णयासाठी १० दिवसांचे अल्टिमेटम…! 

मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची इच्छा वेळोवेळी बोलून दाखवली आहे. पण आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसलाच अल्टीमेटम दिला आहे. काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सर्व काही बातम्यांमधून समजत आहे. पण काँग्रेसला आम्ही ४० जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय १० दिवसांच्या आत कळवावा, अन्यथा २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत, असेही वंचितने म्हटले आहे. वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन काही जागा देण्याचा विचार करत होती, त्याच काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीने आता अल्टीमेटम दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जास्त मते मिळाली होती, हे कारण देत वंचितने हा अल्टीमेटम दिला. येत्या १० दिवसात काँग्रेसने निर्णय न कळवल्यास स्वबळावर लढणार असल्याचेही वंचितने म्हटले आहे. काँग्रेसला कोणत्या ४० जागा हव्यात ते सांगावे, असेही वंचितने स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना किती जागा द्यायच्या ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोपही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात केला होता. निवडणुकीत आम्हाला ४१ लाख मते मिळाली आहेत. त्यामुळे याबाबत काँग्रेसने खुलासा करावा, असेही अण्णा राव पाटील म्हणाले. २०१४ आणि २०१९ ची परिस्थिती वेगवेगळी आहे. काँग्रेस आणि भाजपात तिकीट मिळणार नसलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेली काँग्रेस वंचितच्या या प्रस्तावाला काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे असेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेनेची परंपरागत सत्ता काढून घेण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ”, प्रसाद लाड यांचे सुचक वक्तव्य

News Desk

डिजीटल स्त्री शक्ती- राज्य महिला आयोगाचा उपक्रम, ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’

News Desk

आरोग्यमंत्र्यांनी खोलवर माहिती न घेता RTPCR किट्सवर वक्तव्य केले – अमित देशमुख 

News Desk