HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम

मुंबई। नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कित्येक महिने उलटली तरीदेखील अद्यापही विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. तर आज (22 जून) ला कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली मात्र, या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.’आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. जर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली तर आमचा आकडा आपल्याला दिसेल.’ अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

हा अंतर्गत विषय

‘याबाबतीत जी कार्यक्रम पत्रिका येईल त्यामध्ये आपल्याला नेमका काय कार्यक्रम आहे हे समजेल. आजची बैठक ही कामकाज सल्लागार समितीची होती. त्यामुळे या बैठकीत हा विषय काही चर्चेला येत नाही हा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याविषयी नेते निर्णय घेऊन आपल्याला कामकाज पत्रिकेच्या माध्यमातून सर्व विषय कळतील.’

दोनच दिवसांचं पावसाळी अधिवेशन होणार!

यंदांचं राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन हे फक्त दोनच दिवस होणार आहे. 5 आणि 6 जुलै असे दोनच दिवस अधिवशेन मुंबईत होणार. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नसल्याचं समजतं आहे. ‘सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून सध्या हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असं अनिल परब म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे, ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाणार?

News Desk

राज्यात रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी फेसबुकचे सहकार्य घेण्यात येणार

News Desk

भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करणार का? या आमच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते म्हणून… गृहमंत्र्यांनी पुन्हा फडणवीसांना डिवचले

News Desk