HW News Marathi
महाराष्ट्र

भिडेंवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल

पुणे : श्री शिवप्रतिष्ठांचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आंब्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. भिडेंवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप यांनी भिडे यांच्याविरोधात विश्रामबाग वाडा येथे गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

‘माझ्या बागेतील आंबे खाल्याने मूले होत असल्याचे’, वक्तव्य संभाजी भिडे यांनी नाशिक येथे झालेल्या सभेत केले होता. तसेच हा आंबा आपण १८० जोडप्यांना दिला होता. आणि त्यातील १५० जोडप्यांना मूल झाले असल्याचा दावा भिडेंनी केला होता. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या या विधानाचा निषेध करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या अर्जात विधानामुळे महिलांचा अपमान झाला असून शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यावरील विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण केला असल्याचे देखील यात म्हटले आहे. तसेच जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

Aprna

आज स्त्री शिक्षणाचे दालन खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची जयंती

News Desk

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार! – दीपक केसरकर

Aprna
राजकारण

शिवसेनेचे विचार प्रतिगामी, नवाब मलिकांची शिवसेनेवर टिका

News Desk

मुंबई | शिवसेनेच्या सामना या मुखपत्राच्या आग्रलेखातून बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतल्याचे दिसून आले. या आग्रलेखात पुण्यातल्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभात पवारांनी घेतलेल्या फुले पगडीच्या निर्णयावरुन सडकून टिका करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या पगडीचे राजकारण गाजताना पहायला मिळत आहे. मात्र सामनाच्या या आग्रलेखाला उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना, सामना आणि ठाकरे यांचा चांगलाचा समाचार घेतल्याचे पहायला मिळत आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. महात्मा फुले यांची पगडी ही वैचारिक पगडी आहे. पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून प्रयत्न करत आहोत. शिवसेनेला समतावादी विचार पटत नाही. त्यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता. दलित,ओबीसी,आदिवासी समाजाला आरक्षण देण्याच्या वेळीही शिवसेनेने वाद निर्माण केला. महिला आरक्षण देण्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की महिलांनी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित रहावे याची आठवणही या ट्विटच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.

शिवसेनेचे विचार प्रतिगामी आहेत. महात्मा फुले यांचे समतावादी विचार शिवसेनेला पटत नाहीत म्हणून ते टीका करत आहेत. शिवसेना केवळ एका पगडीला का घाबरत आहे? फुले यांच्या पगडीत मोठी ताकद आहे हे यातून स्पष्ट होते.असे म्हणत बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेची काय भूमिका होती आणि आजही शिवसेनेची काय भूमिका आहे यावर टिका करत मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सेनेचा खरपूस समाचार घेतल्याचे पहायला मिळत आहे. नवाब मलिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे शिवसेनेकडून या ट्विट ला काय प्रतिसाद मिळणार हे पहाण येत्या काळात औत्सुक्याच ठरणार आहे.

Related posts

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा स्थगित, सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य 

News Desk

ऋतुजा लटकेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा! उमेदवारीचा मार्ग मोकळा

Aprna

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

News Desk