HW News Marathi
महाराष्ट्र

‘विनायक मेटेंच्या आरोपावर आता विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मुद्यावरून आता विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मेटेंच्या या टीकेला आता विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विनायक मेटे यांना वाटेल ते बरळण्याचा अधिकार आहे. जातीयवादी कोण आहे हे राज्यातील जनतेला मेटेंच्या मागील दोन-तीन वर्षाच्या वक्तव्याकतून दिसून येतं असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं

विनायक मेटे यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं. मार्गासवर्ग मंडळं त्या-त्या समाजासाठी, भटक्या विमुक्तांसाठी काम करत असतात. विनायक मेटे यांनी वेगळा चष्मा लावला आहे. ज्याला कोणताही आधार नाही असं ते बरळत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मेटेंना प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, विनायक मेटे यांनी वडेट्टीवार हे जातीयवादी माणूस असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विनायक मेटे काय म्हणाले?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली आहे.

मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी आम्ही आज धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा दिलाय. जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर 23 तारखेपासून अहमदनगरपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशाराही मेटेंनी राज्य सरकारला दिलाय. शिवस्मरकाचे काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडलाय, असा खोचक टोला मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लगावलाय. शिवस्मारकाचं कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवं, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी जळगावात केला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारचा निर्णय महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तास असणार ड्युटी!

News Desk

लिलाव बंद होऊन आता डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत मिळणार! – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

 मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचा  यू-टर्न

swarit