HW News Marathi
महाराष्ट्र

“साधूंवर विश्वास ठेऊ नका साधू नालायक असतात”, विजय वडेट्टीवारांचे गंभीर वक्तव्य  

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजय वड्डेट्टीवार यांच्यावर भाजप अध्यात्मित आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी टीका केली आहे. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.

वडेट्टीवाराचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात त्यांनी साधूंबद्दल वाद निर्माण होईल असं वक्तव्य केलेलं आहे. साधू हे नालायक असतात, असं विधान वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्या विधानावर त्यांनी खुलासाही केला. ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारधारेवर महाराष्ट्र उभा आहे. संत आणि साधू यामध्ये फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित असतो. संत दिशादर्शक असतात. साधू हे समाजाला लुबाडणारे आहे. त्यावर आजही मी ठाम आहे,” असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk

पंकजा मुंडेंचा ओबीसी व भटक्‍या विमुक्‍तांचा महामेळावा!

News Desk

४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

News Desk