HW News Marathi
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदत जाहीर, विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

सांगली | राज्यात ३ दिवसांच्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण केली होती. अनेक लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

जीआर प्रमाणे नुकसान भरपाई 

पूरग्रस्तांना मदत हा २०१९ मध्ये पास झालेल्या जीआर नुसार केली जाईल.2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

अजित पवारांचा सांगली दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्याला जाणार होते. हेलिकॉप्टरनेच जाऊ अशी माहिती त्यांनी काल दिली होती, मात्र आज हवामान खराब असल्याने कोल्हापूरचा दौरा रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार आज(२६ जुलै) सकाळी ९ वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊन वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते. नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते.

उपमुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर आला आणि लोकांचं जीवन विस्कळीत झालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, पुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

News Desk

उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार | मुख्यमंत्री

News Desk

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – राजेश टोपे

News Desk