HW News Marathi
महाराष्ट्र

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

मुंबई । मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील जलाशयांतून जवळपास ९ टीएमसी पाणीसोडण्याचा मार्ग मोकळा झाला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकांवर सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आहे. ‘आम्ही तातडीने या याचिकांवर सुनावणी घेऊ शकत नाही’, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले.

तसेच महामंडळाने दोनच दिवसांपूर्वी जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिकमधील चार धरणांचे पाणी जायकवाडीकडे वळविण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाला नाशिकच्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले असून हे धरण भरल्यानंतर ते पाणी पुढे सोडण्यात येणार आहे. तर मुळा धरणातून पाणी सोडण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. नाशिकच्या दारणा धरणावरही आंदोलन करण्यात आले.

धरणात ऐवढे पाणी सोडले जाणार

जायकवाडी धरणामध्ये मुळामधून ५४ दलघमी १.९० टीएमसी, प्रवरामधून १०९ दलघमी ३.८५ टीएमसी, गंगापूर धरणातून १७ दलघमी ०.६० टीएमसी, दारणा धरणातून ५७.५० दलघमी २.०४ टीएमसी, पालखेड समुहातून १७० दलघमी ६० टीएमसी असं एकूण २५४ दलघमी (८.९९ टीएमसी) अशा विविध धरणांमून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? शिवसेनेच्या या प्रश्नाला भाजपकडून प्रत्युत्तर 

News Desk

दानवेंचं चीन-पाकिस्तानवरील वक्तव्य तथ्यहीन – अजित पवार

News Desk

भाजपला जश्याच तशे उत्तर देऊ

News Desk