HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाचा विषय सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर | मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असताना आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय चव्हाट्यावर येतांना दिसतोय. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आता विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी राज्यात निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशारा देखील दिला आहे.

“आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत”, असं त्यांनी सांगितलं आहे.

भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलना आधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी भाजपवर केली आहे. ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या (२६ ते २७ जून) रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं. केंद्रीय संस्था कशाप्रकारे वागत आहेत, हे दाखवण्यासाठी सरनाईक यांचे हे पत्र आहे. असं मला वाटतेय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

लोकलसेवा सुरू होणार नाहीत

मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना विचारण्यात आला त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं मत त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील लोकल कधी सुरू होणार?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी निकष तयार केले होते. तेव्हा मुंबईत बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र दोन आठवडय़ांनी मुंबईतील परिस्थिती सुधारत असून बाधितांचे प्रमाण घटले आहे. असे असले तरी मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यामुळे दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये यांच्यावर सध्याचेच निर्बंध राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गला २५ कोटी जाहीर

News Desk

मासेफेक प्रकरणी नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

News Desk

राज्यपालाने स्वतःकडे ठेवली आहे विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची यादी!

News Desk