HW News Marathi
महाराष्ट्र

आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे, त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते – विजय वडेट्टीवार

मुंबई | अनेक दिवस उलटूनही निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला नाही आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर आता राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्यांचं काम आहे. त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. १८ जुलैला फडणवीस यांनी संध्याकाळी आरोप केला, आमचा प्रस्ताव सकाळी गेला होता”. असे विजय वडेट्टीवार म्हणाले

पुढे ते असेही म्हणाले की, “निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. १८ जुलैला प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे.” अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (२० जुलै) प्रसारमाध्यमांना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कशी होते कोरोनाची चाचणी ? आरोग्य विभागाने केला खुलासा

swarit

भंडाऱ्यात झालेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, फडणवीसांची मागणी

News Desk

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk