HW News Marathi
महाराष्ट्र

भंडाऱ्यात झालेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, फडणवीसांची मागणी

मुंबई | महाराष्ट्रातीस भंडारा जिल्ह्यात रुग्णालयात आग लागल्यामूळे आगीत होरपळून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली.

या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!”, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्रिशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. मृत बालकांच्या मातांनी आणि कुटुंबीयांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला. या घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या बालकांच्या पालकांना ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युध्दपातळीवर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश

News Desk

“मोदींची मूर्ती हटवल्याने चक्क राष्ट्रवादी नेत्यांकडून आंदोलन”

News Desk

माझं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही – प्रताप सरनाईक

News Desk