HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून ओरडतात मात्र केंद्राकडून मदत मिळण्यासाठी काही करत नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर | परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळेल असे चार दिवसांपूर्वी मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यानुसार मदतीचा पहिला हप्ता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याची माहिती नागपूर येथे पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होईल, असा शब्द राज्य सरकारने दिला होता. त्यानुसार २ हजार २९७ कोटी ६ लाख रुपयांची मदत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

उर्वरित मदत ही दिवाळी नंतर दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मदतीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागाला ५६६ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. विदर्भाला केवळ ८ कोटी रूपायांची मदत देणार आहे ही अफवा कोणत्या नेत्याने पसरवली हे माहीत नाही. ८ कोटी रुपयांची ही अफवा सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना मदत द्या, मदत द्या म्हणून ओरडतात. मात्र, केंद्राकडून काही मदत मिळावी, यासाठी स्वतःहून मात्र काही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकार लोकविरोधी सरकार आहे – देवेंद्र फडणवीस

News Desk

मनसेनेचा दणका! अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडले

News Desk

शरद पवारांचा आज एकदिवसीय अमरावती दौरा, विदार्भात मोठा पोलीस बंदोबस्त

Aprna