HW News Marathi
देश / विदेश

ठाकरे सरकार पाण्यात हे बसलेल्या म्हशीसारखे आहे ! विनायक मेटेंचा घणाघात

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्याने गाजतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर तर राज्यातील राजकारण आणखीच पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात टीका, आरोप-प्रत्यारोप झाले. आता भाजप आणि अनेक मराठा संघटना याबाबत बैठका घेऊन मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवत असून सरकारविरोधातील त्यांची आक्रमकता तीव्र आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज (१९ मे) पुन्हा ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. ठाकरे सरकारला मराठा आरक्षणावरून सुनावताना विनायक मेटे म्हणाले की, “हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखे आहे. ढुसणी दिल्याशिवाय हलणार नाही.”

ठाकरे सरकारवर टीका करत यावेळी विनायक मेटे यांनी सरकारला टोकाचा इशारा देखील दिला आहे. विनायक मेटे म्हणाले की, “पुढील आठवड्यापासून मराठा समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. बीडमध्येही ५ जूनला आंदोलन होईल. मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर उतरेल. यावेळी वणवा पेटणार, आम्ही सरकारला दाखवून देणार की मराठा समाजाची ताकद काय आहे”, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

ठाकरे सरकारवर टीका करताना पुढे विनायक मेटे असेही म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार खोटारडे आहे. जेव्हा आम्ही सांगत होतो की SEBCच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करा. तेव्हा विद्यार्थ्यांना न्यायालयात जा म्हणाले आणि आता मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या सरकारला जाग आली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेच ह्याला जबाबदार असून त्यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही”, असा घणाघातही विनायक मेटे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

swarit

तीन दिवस बँका सुट्टीवर

News Desk

लवकरच रामदेवबाबांची जिन्सही बाजारात!

News Desk