HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या विषयात शरद पवारांनी का लक्ष दिले नाही? विनायक मेटेंचा सवाल

मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावण्या सुरुच आहेत. यावरुन आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारले आहेत. मराठा आरक्षणाचा विषय इतका महत्त्वाचा असताना मराठा समाज ज्यांच्यावर इतकं प्रेम करतो ते त्या शरद पवारांनी यात लक्ष का घातले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. उद्या (२६ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे.

विनायक मेटे असं म्हणाले की, “पवार साहेबांना मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अशी विनंती करतो की, आपण या देशाचे नेते आहात, राज्याचे नेते आहात, तसेच, मराठा समाजाचे सुद्धा नेते आहात. अनेक लोकल आपल्याला देव मानतात, अशा नेते असणाऱ्या माणसाने, जाणता राजा असणाऱ्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना बोलावून घेत, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काय तयारी केली आहे विचारावे. तसेच, योग्य ते मार्गदर्शन आणि आराखडा बनवण्यचे काम हे त्यांच्यामार्फत त्यांनी करुन घ्यावे”, अशी विनंती विनायक मेटे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण’, संजय राऊतांची टीका!

News Desk

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील

swarit

‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’ – छगन भुजबळ

News Desk