HW News Marathi
Covid-19

हे सरकार नतद्रष्ट, सगळे तोंडावर पडले ! विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | “महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाच्या हितासाठी केंद्राने ही याचिका दाखल केली आहे. केंद्राने आधीपासूनच स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र, राज्य सरकार खोटं बोलत होतं”, असा घणाघात विनायक मेटे हे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला आहे. विनायक मेटे हे देखील याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेबाबत आभार मनात विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे सरकार नतद्रष्ट !

ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधताना विनायक मेटे म्हणाले कि, “१०२ घटनादुरुस्तीबाबत काही लोकांनी संभ्रम निर्माण केला होता. या १०२ घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार काढून घेतले नाहीत. खरंतर राज्य सरकारने अशाप्रकारची याचिका दाखल करण्याची आवश्यकता होती. पण ह्यांनी फक्त टीका करण्यात समाधान मानलं. मात्र, हे सरकार नतद्रष्ट आहे. अशोक चव्हाण यांचं खोटं बोलणं सुरुच आहे. आम्हालाही टार्गेट केलं गेलं. मात्र, हे सगळे तोंडावर पडले. काल ह्यांचं तोंड काळं झालं आहे”, अशा शब्दात विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर टोकाची टीका केली आहे.

फडणवीसांसोबत राष्ट्रपतींची भेट घेणार !

“सगळंच जर केंद्र सरकारने करायचं तर तुम्ही काय करणार ? पत्र लिहून किंवा हाता पाया पडून आरक्षण मिळत नाही. आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचे सोडून हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसलंय. आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही”, असा घाणाघातही यावेळी विनायक मेटे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती करुन राष्ट्रपतींची देखील भेट घेणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका ऐवजी १० कंपन्याना कोरोना लस बनविण्याचं लायसन्स द्या, नितीन गडकरींचा केंद्राला सल्ला

News Desk

ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन अखेर ‘कोरोनामुक्त’, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

बारामतीबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,अजित पवारांचा इशारा !

News Desk