HW News Marathi
Covid-19

पाऊस, वारा काहीही असले तरी उद्याचा मराठा मोर्चा निघणारच ! विनायक मेटेंचा इशारा

मुंबई । “बीडमधील मराठा समाजाच्या ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणा’चा या लढ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने काही जणांच्या पोटात पोट शूळ उठला आहे. म्हणून बीडशी संबंध नसताना इथे येऊन विरोध करत आहेत अशा विरोधाना आम्ही भीक घालत नाही. पाऊस, वारा काहीही असले तरी उद्याचा मोर्चा निघणारच”, असा स्पष्ट इशारा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केला. ते आज (४ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना विनायक मेटे म्हणाले की, “मराठा समाजाचे नाव काढले तरी काँग्रेसच्या पोटात दुखते. त्यांची ही भूमिका पूर्वीची आहे. मराठा समाजाचे नेते कै अण्णासाहेब पाटील यांची आत्महत्या नसून काँग्रेस सरकारने केलेली हत्या आहे . मराठा आरक्षणा संदर्भात असे अनेक खून काँग्रेस केले आहेत. मोर्चा संदर्भात अनेक लोक गरळ ओकत आहेत. मात्र, आमचा हा मोर्चा बोलका आहे मुका नाही. त्यामुळे आम्ही सरकारचे वाभाडे काढणार. या सरकारला मराठा समाजाकडे दुर्लक्ष करू देणार नाही. मोर्चाला अडवलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेऊ. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा कोणत्याही परिस्थितीमध्ये निघेल”, असे विनायम मेटे यांनी स्पष्ट केले आहे.

बीडच्या मराठा मोर्चाला भाजपचे फडिंग । काँग्रेस

विनायक मेटे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. बीडमधील मराठा आरक्षण मोर्चा हा भाजपचा अधिकृत मोर्चा आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ संजय लाखे पाटील यांनी केला आहे.

या मोर्चाला भाजपची फँडिंग असल्याचे संजय लाखे पाटील म्हणाले. “विनायक मेटे हे भाजपचा मराठा आरक्षण प्रचार सेलचे अधिकृत सदस्य आहेत. मेंटेंनी मराठा समाजाची फसवणूक करू नये”, असा आरोपही संजय लाखे पाटील यांनी केला आहे. ते बीड मधील पत्रकार परिषद बोलत होते. विनायक मेटेंचा हा मोर्चा राजकीय. आम्हीही राजकीय उत्तर देऊ. पण आम्हाला भीती रायगडाची आहे. या राजकीय पक्षाच्या धमकीला मी भीक घालत नाही”, असेही लाखे पाटील म्हणाले.

राज्य सरकारच्या प्रश्न राज्य सरकारने सोडवले पाहिजे आणि केंद्र सरकारचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले पाहिजे तू तू मै मै करू नये व मराठा समाजावर अन्याय करू नये अशी मागणी संभाजीराजांनी आहे. संभाजीराजे म्हणत आहेत दिल्लीला जाऊन आपण हा प्रश्न सोडवू.भाजपच्या सर्व नेत्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी मराठवाडयात फिरण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊन मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

News Desk

पुण्यात आज नवे २७५ कोरोनाबाधित रुग्ण

News Desk

महागाई भत्त्याला स्थगिती देण्यापेक्षा बुलेट ट्रेनच्या प्रकल्प रद्द का नाही केला?

News Desk