HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला, विनोद पाटलांचा आरोप

औरंगाबाद | मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजसोबत राज्य सरकारचं वर्तन दोषपूर्ण आहे. विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत. ‘फी’मध्ये देखील सवलत दिली नाही. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असल्याचं विनोद पाटील म्हणाले. राज्य सरकारने लाखो मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान केले आहे. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या विरोधात असल्यासारखं वागतंय. सुप्रीम कोर्टातही राज्य सरकारची चाल ढकल सुरु आहे. आता सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं विनोद पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त भागात दररोज 15,000 थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर!

News Desk

‘राणे विरुद्ध शिवसेना संघर्षावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया’, ‘..तर’ याबद्दल!

News Desk

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवा कृषी कायदा करावा – अशोक चव्हाण

News Desk