HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा खोचक टोला

मुंबई | संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अशात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आघाडी सरकारवर सडकून टीका करण्याचे काम सुरुच ठेवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं, असा खोचक टोला भाजप नेते विनोद तावडे यांनी लगावलाआहे. शरद पवार स्वत: देशाचे कृषिमंत्री होते त्यामुळे जर त्यांना केंद्राच्या कृषी धोरणात काही दुरूस्त्या सुचवायच्या असत्या तर त्यांनी राज्यसभेत बोलायला हवं होतं, असेही विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कृषी विधेयक राज्यसभेत मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावरून पवारांनी संताप व्यक्त करत एक दिवस अन्नत्याग केला होता. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही, असं विनोद तावडे यांनी सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1800 कोटींचे नुकसान, मंत्री अशोक चव्हाणांची माहिती!

News Desk

शिर्डीत शेतक-याला पोलिसांनी केली बेदम मारहान

News Desk

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल कंगना राणावतचे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रश्न

News Desk