HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : राज्यात ६०.०५ टक्के मतदान, आज कळणार जनतेचा कौल

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६०.०५ टक्के मतदान झाले आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत ६०. २५ टक्के मतदान झाले आहे. तसेच कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून तर ठाण्यात ४३ टक्के सर्वात कमी मतदान झाले. राज्यभरात सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती.

राज्यातील एकूण मतदार :

  • महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार.
  • महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत.
  • यामध्ये पुरुष मतदार – ४ कोटी ६८ लाख ७५हजार, ७५०
  • महिला मतदार- ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५
  • तृतीयपंथी मतदार- २ हजार ६३४ आहेत.
  • दिव्यांग मतदार – ३ लाख ९६ हजार आहेत
  • सर्व्हिस मतदार- १ लाख १७ हजार ५८१ आहेत

मतदान केंद्रे

  • विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे आहेत.मुख्य मतदान केंद्र – ९५,४७३
  • सहायक मतदान केंद्र – १,१८८
  • ‘सखी मतदार केंद्रे’ – ३५२
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही, तर जनताच….’, सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना इशारा

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?

News Desk

मौजमजा करण्यासाठी ते शाळा चुकवून पळाले

News Desk