HW News Marathi
महाराष्ट्र

मौजमजा करण्यासाठी ते शाळा चुकवून पळाले

नाशिक: रोज शाळेत जाऊन अभ्यास घोकत बसण्याला कंटाळलेल्या नववीतील चार विद्याथ्र्यांनी घरच्यांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची घटना जिल्ह्यातील दिंडोरी भागात घडली. शाळेत जातो सांगून त्यांनी गुरुवारी सकाळी धूम ठोकली आणि थेट गुजरात सीमेवरील सापूतारा हे थंड हवेचे ठिकाण गाठले.

दरम्यान, शाळा सुटल्यावरही ते न परतल्याने घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक (मविप्र) जनता इंग्लिश स्कूलमधील इयत्ता नववीत शिकणारे हे विद्यार्थी आहेत. यातील दीपक कडाळे आणि जीवन बल्हाळ हे दोघे दिंडोरी येथे, तर अमोल सुदाम चौधरी तळेगावात आणि कुलदीप सुनिल देशमुख ओझरखेड येथे राहतात. सुदैवाने गुरुवारी रात्री उशिरा ते घरी परत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

गुरुवारीसकाळी अकराच्या सुमारास ते शाळेत जाण्यासाठी घरून निघाले, मात्र शाळेत न जाता ते सापुतारा येथे फिरण्यास गेले. संध्याकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतरही ते घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. राञी उशीरा दिंडोरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक सापूताराला रवाना झाले. सुदैवाने दिवसभर सापुतारा येथे पर्यटन करून चौघेरात्री एक वाजता घरी पोहोचले. सापुतारा येथे फिरायला जाऊ व पाच वाजेपर्यंत परत येऊ असा त्यांच्या अंदाज होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या !

News Desk

नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्था’वर दाखल; चर्चांना उधाण

Aprna

राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब! – अजित पवार

Aprna