HW News Marathi
महाराष्ट्र

उजनीच्या हक्काच पाणी सोलापूरचंचं!भरणेंविरोधात शेतकऱ्याचं धरणात उतरून आंदोलन

सोलापूर | सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी योजना मंजूर केली. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर हात मारल्याने जिल्ह्यात विरोध सुरू असून उजनी धरणात विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू होते.

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सुरु असून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी आज (१ मे) पहाटे पासूनच शिराळ टे, सुरली, उजनी टे, भिमानगर या गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी देखील छुप्या मार्गाने मिळेल त्या वाटेने शेतकरी उजनी धरण जलाशयाकडे आले आहेत. शेतकरी नेते अतुल खुपसे, जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांना आंदोलनस्थळी येऊ दिले नाही. दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत ७ मेला सोलापूर येथे बैठक होणार असल्याने तुर्तास तरी या आंदोलनाला यश आले आहे.

उजनीतील ५ टीएमसी पाणी पालकमंत्री भरणे यांनी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापुरातील बावीस गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी पळविल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे, तर विविध शेतकरी संघटना यासाठी आक्रमक झाल्या आहेत. हे पाणी नेल्याने शेतकऱ्यांची आबाळ होणार असून त्यांच्यावर गदा आली आहे.

दरम्यान, सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री येऊन निर्णय घेत नाहीत तोपर्यंत पाण्यातच राहणार असल्याचेे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले होतेेेे. वेळ आलीच तर पाण्यात मरू मात्र हक्काचे पाणी देणार नाही, अशी ठोस भूमिका देशमुख यांनी घेतली आहे. दरम्यान, या पळविलेल्या पाण्याचा कारखानदारीवरही मोठा परिणाम होणार आहे.

कारण पाणी नसल्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होणार आहे. परिणामी शेतकरी व कारखानदारांचे मोठे नुकसान होणार आहे. सत्ताधारी आमदारांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या संघर्षात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही देशमुख यांनी या वेळी केलेेेे होते.

आंदोलनात देशमुख यांच्यासह “प्रहार’चे अतुल खुपसे, संजय बाबा कोकाटे, माऊली हळवणकर, बळिराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जनशक्ती संघटना पस्तीस गावे उपसा सिंचन संघर्ष समिती, बापू मेटकरी, माऊली जवळेकर व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उडान’द्वारे पर्यटन, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या – नरेंद्र मोदी

News Desk

नवाब मलिकांसह ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची नार्को टेस्ट करावी, आशिष शेलारांची मागणी

News Desk

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत!  – अब्दुल सत्तार 

Aprna