HW News Marathi
Covid-19

गज की दूरी, सत्ता की लालच बुरी, जयंत पाटलांची भाजपवर टीका

मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (२० मे) ट्वीटमध्ये म्हणाले. यापार्श्वभूमीवर उद्या (२२ मे) भाजपचे राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन सुरू होणार आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान, “भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते,” यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे.

जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले, “चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!,” भाजपने त्यांना कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचनांचे पत्रक ट्वीट केले आहे. यात भाजपने कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहे. यात “उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार,” असे फलक असावेत ही महत्तवाची सुचना दिली आहे.

भाजपने कार्यकर्त्यांना ‘या’ दिल्या सूचना

आंदोलनचे स्वरुप संदर्भात सांगितले, प्रत्येक कार्यर्त्यांने घरीत गॅलरीत व्हरांड्यात किंवा आंगणात दो गज कि दूरीचे पालन करून घरातील सदस्यांसह एकत्र यावे, तोंडावर मास्क असणे अनिवार्य आहे. डोक्यावर काळी रिबीन, काळा ओढणी बाधावी किंवा काळ्या फिती लावाव्यात, काळे कपडे असतील तर ते परिधान करावे. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया, पत्रकारांना सूचित करावे, त्यांना येणे जमत नसेल तर आपणच घरी मोबाईलद्वारे फोटो काढून सर्व मिडियाला पाठवावे, अशा सूचना दिल्या आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण ३९ हजार २९७ वर

News Desk

“तुम्ही लष्कराचा वापर करणार आहात का?”, सुप्रीम कोर्टाची कडक शब्दांत केंद्राला विचारणा

News Desk

नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल

News Desk