HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे !

मुंबई | “आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे”, असे विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. आज (१६ जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर गिरीश महाजन बोलत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले”, असे गिरीश महाजन म्हणाले.

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी “पक्षात आयात केलेल्या लोकांना संधी दिली जात आहे” असे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला होता. यावर देखील गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राजकरणात सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. लोकसभेत आम्ही पक्षात नवीन लोक घेतली. मात्र, त्यांच्यामुळेच अनपेक्षित निकाल लागला. खडसे साहेब आमचे नेते आहेत. त्यांच्या या विधानाचे आश्चर्य वाटते”, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

“राज्य मंत्रिमंडळात सामील झालेल्या नव्या मंत्र्यांचा निश्चितच त्यांच्या जिल्ह्यांना आणि महाराष्ट्राला फायदा होईल. तसेच येत्या निवडणुकीसाठी देखील भाजपला देखील त्याचा फायदा होईल”, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले. बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज (१६ जून) पार पडला. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून आज संध्याकाळी या सर्व मंत्र्यांची खाती जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंच्या सत्कारावर आक्षेप; राज्य सरकारकडे कारवाईची मागणी

News Desk

एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांकडून परवानगी

News Desk

१०वी-१२वीची परीक्षा ऑफलाईनच होणार!

News Desk