HW News Marathi
Covid-19

“कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना?, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

मुंबई | आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (१ जून) पत्र लिहिले.

“तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी- जेवढे सेमिस्टर झाले आहेत. त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचे ठरवले आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी काल (३१ मे) राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हणाले. यानंतर आशिष शेलार यांनी आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?, असे सवाल त्यांनी त्यांच्याद्वारे उपस्थित केले आहे.

“पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्याची काळजी घेणे योग्यच! त्यासोबत त्यांचे शैक्षणिक आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेळीच देऊन सरकारने विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करावे,” असे आशिष शेलार दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून पॅसेंजर ट्रेन्स सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

News Desk

“कोरोना लसीच्या दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय वैज्ञानिकांचा गंभीर दावा!

News Desk

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk