HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन, शुक्रवार ते रविवार कडक निर्बंध!

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनकरणार नाही असं सांगण्यात आलं आहे. मात्र, कडक निर्बंध लागू करणार असल्यावर एकमत झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यामुळे राज्यावरील लॉकडाऊनची टांगती तलवार अटपूररती का होईना पण टळली आहे असं म्हणावं लागेल.

राज्यात उद्यापासून (५ एप्रिल) कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. यामध्ये त्यांनी राज्यात कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे, राज्यातील कोरोना परिस्थिती वाईट झाली आहे, यामुळे सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. यावर दोन्ही नेत्यांकडून सरकारला अपेक्षित सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर मनसेने सर्व नेत्यांना कोरोनावरील सरकार उचलत असलेल्या पावलांना विरोध करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ७९० नवीन रुग्णांचे निदान, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली

News Desk

राज्यात सध्या सुरु असलेले हे राजकारण हा करमणुकीचा भाग !

News Desk

पुणेकरांनो थोडी कळ सोसा, वडेट्टीवारांचा सल्ला!

News Desk