HW News Marathi
महाराष्ट्र

जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय? जाणून घ्या…

रसिका शिंदे | जगावर आत्तापर्यंतचे सगळ्यात मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे संपूर्ण जगंच लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भारतात राजस्थान, पंजाब, दिल्ली तसेच महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच, सगळीकडे १४४ कलम म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीत ५ पेक्षा अधिक जण एकत्र येऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता सरकारने जमाव बंदी तर लागू केली होतीच पण चिघळणारी परिस्थिती लक्षात घेता संचार बंदी देखील लागू करण्यात आली आहे. पण नक्की जमाव बंदी आणि संचार बंदी यातील फरक काय जाणून घ्या…

जमावबंदी म्हणजे काय?

१४४ कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात येते. यात स्थानिक पातळीवर पोलिस वेळोवेळी जमावबंदीचे आदेश देऊ शकतात. यात ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. जर ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते. या जमाव बंदीत पाच किंवा अधिक लोक एकत्रित येऊन एखादा कार्यक्रम घेऊ शकत नाहीत किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करू शकत नाहीत. तसेच, लग्नकार्यही या काळात करु शकत नाही. जर यातील कोणतीही बाब केली तर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारावाई होई शकते. दरम्यान, भाजीपाला, घरातील किराणा सामान हे बाहेर जाऊन आणण्याची मुभा जमावबंदीत असते. पाचपेक्षा कमी लोक असतील आणि जर त्यांना पोलिसांनी अडविले तर बाहेर जाण्याचे ठोस कारण त्यांनी पोलिसांना सांगणे अपेक्षित असते. आता जाणून घेऊयात संचारबंदी म्हणजे काय?

संचारबंदी म्हणजे काय ?

संचारबंदी लागू झाल्यास नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लावले जातात. त्यास ‘कर्फ्यू’ असेही संबोधले जाते. कलम १४४ मधील तरतुदीनुसार जमावबंदी आणि संचारबंदी लागू होते. संचारबंदीत निवडण्यात आलेली ठिकाणे किंवा परिसरात नागरिकांना बाहेर पडता येत नाही. सरकार ही बंदी दंगल किंवा आपत्कालीन परिस्थितीत लागू करु शकते. जमावबंदीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नागरिकांना संचार करता येतो; मात्र संचारबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नसते. संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात. संचारबंदी लागू केली गेली अशी जर अफवा येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली संचारबंदी ही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे असून जिचकी कमी गर्दी होईल तितक्या लवकर या संकटातून संपूर्ण जग वाचवता येऊ शकते. त्यामूळे उगाच आत्मविश्वास दाखवू नका आणि मला काही होणार नाही या गैरसमजाने घराबाहेर पडू नका. सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा आणि सरकारला सहकार्य करा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आत्ता पर्यंत कधीच राजकारण केले नाही, केले ते फक्त समाजकारण’, धनंजय मुंडे

News Desk

फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ ला ठाकरे सरकारची क्लीन चीट

News Desk

अवैधरित्या सागवान तस्करी करणारा टेंम्पो भोकर वनविभागाने पकडला

News Desk