HW News Marathi
महाराष्ट्र

“..आता मी सीडी लावण्याचं काम करणार”, खडसेंचा भाजपला इशारा  

जळगाव | राष्ट्रवादी परिवार संवादच्या निमित्ताने जामनेर येथे एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपनं माझा जेवढा छळ केला आहे ते त्यांना महागात पडणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे, भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात पक्ष सोडताना असुरक्षितता आहे असंही खडसेंनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, “आज कार्यकर्ते भाजपा सोडत आहेत, त्यांच्या मनात असुरक्षितता आहे, इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्यामागे ईडी लावली जातेय, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जातं आहे, पण मी कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधीही २ नंबरच्या धंद्यात पडलो नाही, अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतलेत, कामासाठी पैसे घेतलेत, एकाने उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलत आहेत”, असं आव्हान त्यांनी यावेळी भाजपला दिले आहे.

“त्याचसोबत ४० वर्षापासून नाथाभाऊ असाच आहे, काहीच उद्योग केले नाहीत, म्हणून भाजपला नाथाभाऊंबद्दल शोधून शोधून काहीच सापडत नाही. बायकोने जमिनीचा व्यवहार केला पावणे चार कोटीचा, त्यात अर्धाव्याज आहे पावने दोन कोटीचा, त्यात नाथाभाऊ खात्यावरून दिले २५ लाख रुपये, माझ्याकडे शेती आहे, मी जमीनदाराचा पोरगा आहे, तरीही त्याचसाठी नाथाभाऊंचा छळ सुरू आहे आणि छळणं महागात पडेल, पण भाजपाला मी सांगू इच्छितो जेवढं तुम्ही नाथाभाऊंचा छळ कराल तेवढचं तुमच्यापासून पदाधिकारी आणि माणसं दूर जातील ते NCP कडे वळतील. आजही अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत येत आहेत”, असा इशारा एकनाथ खडसेंनी भाजपला दिला आहे.

..आता मी सीडी लावण्याचं काम करणार

“मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटलांसह अनेकांनी मला सांगितलं तुमच्या मागे ईडी लागू शकते, त्यावर मी प्रवेश मेळाव्यात म्हटलं होतं, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. परंतु आता माझ्यामागे प्रत्यक्षात ईडीची चौकशी लावली आहे, त्यामुळे मी सीडी लावण्याचं काम करणार आहे”, असं म्हणत खडसेंनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे.

“मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही असं सांगताना एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. भाजपमध्ये जाणीवपूर्वक बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं जातं. ज्यांनी पक्षाला मोठं केलं, त्यांच्यावरच बेछूट आरोप केले. जे बापाचे होत नाहीत, ते जनतेचे काय होणार?”, असा घणाघाती आरोपही एकनाथ खडसेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार पडण्याचा प्रयत्न करणे ही आमची संस्कृती नाही -चंद्रकांत पाटील

News Desk

डिजिटल जनगणनेत ओबीसींचीही जनगणना करा | छगन भुजबळ

News Desk

मंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

News Desk