HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने जे केलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं ,उद्धव ठाकरेंची खंत

मुंबई। सभागृहात भाजप सदस्यांनी केलेल्या राड्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता आपलं मौन सोडलं आहे शरमेनं मान खाली जाईल असं कालचं अर्थातच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं दृश्य होतं. मी नवीन आमदार आहे. पण कालचा प्रकार पाहून मी अवाक झालो, असं शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. कालच्या (५जुलै) च्या प्रकारावर भाष्य केलं. बाळासाहेब थोरात हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. त्यांच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. माझ्या पहिल्याच कारकिर्दीत मला हा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे मी अवाक् झालो. ही लाजीरवाणी घटना आहे. यातून आपण कामाचा दर्जा उंचावतो की दर्जा खालावतो याचं भान विरोधकांना राहिला नाही. विरोधकांचं असं वागणं महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. शरमेनं मान खाली जावं असं दृश्य होतं. जबाबदार विरोधी पक्षाकडून हे होणं वाईट आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले

विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी आम्ही जनतेच्या जीवाशी खेळणार नाही. राजकारण करणार नाही. आम्ही एवढे नीच वागणार नाही, अशी झणझणीत प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही, हे मी राज्यपालांना कळवलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आरडाओरड करणं ही लोकशाही नाही-

आमच्या १२ आमदारांची नियुक्ती केली नाही. म्हणून त्यांच्या १२ आमदारांना निलंबित केलं असं नाही. हे आम्ही ठरवून केलं नाही किंवा ठरवलं नव्हतं. आम्ही त्यांना टोचलं नव्हतं. त्यांनीच ते केलं. आरडाओरड करणं ही लोकशाही नाही. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नाही. अशी लोकशाही असेल तर ती रस्त्यावर जाऊन करा, असंही ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी सभागृहात त्यांच्या दालनातील अर्धवट वर्णन केलं. त्यांनी पूर्ण वर्णन केलं नाही. शिसारी येणारं हे प्रकरण होतं. हा पायंडा पडू नये, महाराष्ट्रात असं होऊ नये. त्यांचा जर सत्ता ऐके सत्ता हा अट्टाहास असेल तर खूप वाईट आहे, असं देखील म्हणायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले नाही.


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

तासगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

News Desk

मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवली – परमबीर सिंह 

News Desk