HW News Marathi
महाराष्ट्र

“बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले ,एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले” – मुख्यमंत्री

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३ मार्च) आपल्या भाषणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम!!” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद प्रकरणाची भाजपला आठवण करुन दिली आहे.

“भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

बंद दाराआडच्या वचनावरुन मुख्यमंत्री आक्रमक विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी”, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी !

News Desk

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात आणखीनच वाढ!

News Desk