HW News Marathi
महाराष्ट्र

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

मुंबई। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुदैर्वी आणि संतापजनक आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराच्या हा नमुना आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या बेजाबदारपणामुळे घडलेली ही दुर्घटना निषेधार्ह आहे. आता ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जाईल. पण अशा आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी सरकार उपाययोजना कधी करणार? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केला.

उपाययोजना सरकारकडून केल्या जात नाही

आगीच्या या घटना वारंवार घडत आहेत. भंडारामधील आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. विरारला विजय वल्लभ हॉस्पिटलाची आगीची दुर्घटना, मुलुंडमधील ड्रीम मॉलमधील आग, नाशिकला प्राणवायू गळतीमुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागले. प्रत्येक वेळी सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकार देते. पण अशी दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारकडून केल्या जात नाही. यावरुन या सरकारचे आरोग्य व्यवस्थेमध्ये किती लक्ष आहे हे दिसून येते, अशी टीका दरेकर यांनी केली.

गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या दुर्घटना प्रकरणात जी चौकशी करण्यात आली, त्या चौकशीचे नेमके काय झाले याची माहिती महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला हवी. कारण अशा प्रकारच्या दुर्घटनेतून संवेदनहीन सरकारकचे याकडे लक्ष नाही, हेच दिसते. त्यामुळे किमान सरकारने आता तरी जागे व्हावे आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

Aprna

आता महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर!

News Desk

जनता मराठीतून कामकाज करणार आणि अधिकाऱ्यांना इंग्रजीची मुभा देणार का? – आशिष शेलार

Aprna