HW News Marathi
महाराष्ट्र

पूर आला तेव्हा सदाभाऊ तुम्ही कुठे होता ? आव्हाडांचा सवाल

मुंबई- महाराष्ट्रावरचे महापुराचे संकट हळूहळू कमी होत आहे. मात्र महापूर ओसरला आणि राजकीय व्यक्तींनी या महापूरालासुद्धा राजकीय संघर्षाची जोड दिली आहे.राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस महापुराचे राजकारण करून पूरग्रस्तांना राज्यसरकारविषयी भडकवत आहे असा आरोप केला . सदाभाऊंच्या या आरोपावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे .

महापूर असताना सदाभाऊ तुम्ही कुठे हुंदडत होता, असा थेट सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांना केला आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष ८० वर्षांचा तरूण पुराची पाहणी करण्यात व्यस्त आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तब्येतीची पर्वा न करता पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फिरत आहे.तुम्ही मात्र जो नाटकीपणा केला त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर हसत आहे . त्यामुळे आता राजकारण न करता संकटग्रस्तांचे डोळे पुसण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.

२००५ ला पूर आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पूरग्रस्तांना जेवढी मदत केली त्यापेक्षा जास्तीपटीने आमचे सरकार मदत करत आहे. राष्ट्रवादी फक्त निवडनुकीसाठी मदत करण्याचे नाटक करत आहे असा आरोप सदाभाऊंनी राष्ट्रवादीवर केला होता. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय ? पाण्यात उतरले असते तर स्वागत केलं असतं अशी घणाघाती टीकाही खोत यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांनी कुटुंबाची माफी मागितली नाही तर… भाजप आमदाराचा इशारा

News Desk

निरा डाव्या कालव्याबाबत काय म्हणतात… रणजिंतसिंह मोहिते पाटील

News Desk

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण 

News Desk