HW News Marathi
महाराष्ट्र

तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको! – सुनिल केदार

नागपूर । नागपूर-इटारसी तिसऱ्या लाईनसाठी भूसंपादन करताना कळमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्तेच राहिले नाहीत. रेल्वेने तूर्तास कोणतेही काम करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी त्यांना प्रथम रस्ते उपलब्ध करावेत. त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी मार्ग करुन द्यावा. त्यानंतर आपल्या कामाला गती द्यावी, असे आदेश पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी काल (१७ जानेवारी) दिले.

काल छत्रपती सभागृहात झालेल्या बैठकीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी या सूचना दिल्यात.

कालच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

यावेळी या बैठकीत कोहळी-मोहळी, खापरी कोठे, ऐलकापार रिठी, कोहळी, चाकडोह या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या वहिवाठीचा रस्ता बंद झाल्याबाबत, कळमेश्वर ब्राम्हणी, घोराड क्रॉसिंग गेट बंद करण्याच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत गावांच्या सरपंचासोबत मौका पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पंधरा दिवसात यासंदर्भात रेल्वेकडून कारवाई झाल्याचा अहवाल मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कळमेश्वर ब्राम्हणी मोठा पूल जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत गेट बंद होणार नाही असेही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जी – २०’ निमित्ताने पुण्यासह राज्य, देशाला क्षमता दाखविण्याची संधी! – चंद्रकांत पाटील

Aprna

खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे नगरसेवक मनिष आनंद यांच्यासह ७ जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न,विनयभंगाच्या कलमान्वये FIR दाखल

News Desk

…पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो!

News Desk