HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण ?

अहमदनगर | राजकीय नेत्यांमुळे ते गुंडाचे माहेरघर झाले आहे. बिहार, उत्तरप्रदेशपेक्षा येथील गुंडगिरी घातक आहे. राजकीय नेत्यांनी आपले प्रस्थ टिकवण्यासाठी गल्लोगल्ली गुंडांच्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्यांना पोसण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते.

हॉटेले, ढाब्यासह काही अैवध धंदे सुरू करून तरुणांना या कामी जुंपले जाते. त्यातून आलेल्या पैशातून हे पोसलेले गुंड निरापराध लोकांची हत्या करतात. नगर जिल्ह्यातील भानुदास कोतकर या सराईत गुन्हेगाराने अनेक निरापराध लोकांचे बळी घेतले आहेत.

परंतु सुस्थावलेल्या पोलिस यंत्रणेने आपले कार्य तत्पर केले नाही. परिणाम त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पैशाच्या जोरावर आपण कुणावरही मात करू, या भ्रमात हे गुंड मंडळी नको ते कृत्य करत आहे. शेवगाव तालुक्यातील लांडे खून प्रकरणामुळे कोतकर कुटुंबिय जेलमध्ये असेल तरी त्यांचा वारस चालवण्याचे काम त्यांचे नातेवाईक करत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या खून प्रकरणामुळे ते प्रकर्षाने जाणवले.

कोतकरांचे व्याही व इतर नातेवाईक त्यांचा वारसा चालवत आहेत. त्यातूनच त्यांना काल खून प्रकरणात अटक झाली आहे. गुंडांना पोसण्यात या नेत्यांचा हात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यांचा बिमोड करण्यासाठी सिंघम अधिकाऱ्याची गरज आहे. परंतु अधिकारी विकले जात असल्याने हे गुंड मोकाट राहतात.

नगर जिल्ह्यातील माध्यमांमध्ये या गुंडाचा धाक आहे. पेपर किंवा वाहिनीवर संबंधित गुंडाचे छायाचित्र छापून आले तरी संबंधित छायाचित्रकारास किंवा पत्रकारास धमकी दिली जाते. हे थांबवण्यासाठी सरकारने तीन आमदारांवर गुन्हे दाखल करून त्यातील दोघांना अटक केली असली त्यांना जामिन मिळणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”

News Desk

FIR सार्वजनिक करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार? चित्रा वाघ यांचा परखड सवाल

News Desk

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

News Desk