HW News Marathi
Covid-19

‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? नाना पटोलेंचा सवाल

मुंबई। कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं सध्या दबक्या आवाजात चर्चा आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत इतकंच नाही तर भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीच्या निर्णयावर टीका केली होती. आता, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. जळगावच्या दौऱ्यावर असताना नाना पटोले माध्यमांशी बोललेत.

राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केलाय. टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका घेण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना आमदाराच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून म्हाडाच्या सदनिका देण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली. तर आता नाना पटोले यांनी टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल केला आहे.

शिवसेनेच्या आमदाराची नेमकी तक्रार काय ?

महाराष्ट्र भरातूनच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात.पर्यायाने त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. (१६ मे )रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

मात्र शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. आपण आव्हाड यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांच्याकडे तक्रारही केली होती. पण त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. चौधरी यांच्या तक्रारीवर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

News Desk

ओमायक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय! – राजेश टोपे

Aprna

राज्यात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत विक्रमी वाढ, एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले

News Desk