HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले ?, फडणवीसांचा सवाल

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (१५ जून) पुन्हा एकदा ठाकरे सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वचजण जाणतो कि, मुंबईतील कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबईची कोरोनाची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील तब्बल ९५० कोरोना मृत्यू लपविल्याचा आरोप करत याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक पत्र लिहिले आहे. “मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले ? ‬‪इतके अक्षम्य दुर्लक्ष का ?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांकडून विचारण्यात आला आहे.”मुंबईत सुमारे ९५० अधिकचे मृत्यू हे कोरोनामुळे झालेले आहेत. मात्र, त्या मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोनास्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जनसामान्यांना द्यावी आणि हा गैरप्रकार केलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी”, असे मागणी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या पत्रात केली आहे.

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात कि, “कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने करोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत”.

“आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठवले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. आयसीएमआरच्या गाइडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने करोनामुळे झालेले मृत्यू हे करोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे”, असे देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात.

पुढे फडणवीस असेही नमूद करतात कि. “तपासणी करून ३५६ अपात्र ठरवलेले करोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजे. आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि करोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते करोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे करोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे करोनाचे मृत्यू करोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाला अखेर मुहूर्त लाभला

News Desk

मराठवाड्याच्या हितासाठी धनंजय, पंकजा एकत्र ?

News Desk

शिवसेना हिंदुत्वापासून दुर गेली, अमित ठाकरेंचा गंभीर आरोप

News Desk