HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील? राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे यांना पुन्हा एकदा तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी दोनच शब्दात पण मिश्किल उत्तर दिलं आहे. लोकसत्ता या दैनिकाच्या एका विशेष मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी हा प्रश्न विचारला होता.

राज ठाकरे म्हणाले परमेश्वराला माहित…

तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली. दैनिक ‘लोकसत्ता’ने आज राज ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर देतानाच उद्धव-राज एकत्र येणार का? या प्रश्नावरही उत्तर दिलं आहे.

युतीचं नंतर पाहू – राज ठाकरे

पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाशी युती होईल का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीचा विचारच नकोच

कोरोना आजार आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे. समाजाचं मन स्थिर होणं महत्वाचं आहे, हा समाज स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

इतरांसारखंच वागायचं का?

आम्ही नाशिकमध्ये खूप कामं केली. 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. पाणी प्रश्न मिटवला. हे चांगलं आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमकं हवं काय आहे? इतरांसारखंच वागायचं का?, असा सवाल करतानाच कामाची अपेक्षा करायची आणि निवडणुकीवेळी मतदान वेगळ्याच पद्धतीने करायचं असं कसं चालणार? असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाला एक वेगळं वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा, यांची किर्ती अवघा महाराष्ट्र जाणून आहे. त्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहचत असे. त्यांच्या पुढची पिढी म्हणजे त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुतणे राज ठाकरे. शिवसेनेतल्या अस्वस्थेला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रात एक प्रश्न मराठी माणसाच्या मनात कायम आहे तो म्हणजे ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या मुलाखतीमधून दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, शिवसेनेचा ‘संभाजीनगर’चा मुद्द मनसेकडून हायजॅक

swarit

चुकीचे काम केले तर जेलमध्ये चक्की पिसायला पाठवेन – अजित पवार 

News Desk

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप

News Desk